Ad will apear here
Next
भारतीय पारंपरिक खेळ व त्यामागील शास्त्र
‘आई मला खेळायला जाऊ दे न व!’ या गाण्यातील चिमुकला जसे बाहेर खेळण्यास जाऊ द्यावे, यासाठी आईची विनवणी करीत असतो, तसे चित्र बहुतेकांच्या घरात असते. खेळातून मुलांच्या शरीराचा व मनाचा विकास होत असतो. महागडे साहित्य, गणवेश याची गरज न भासता अनेक अस्सल देशी खेळ खेळता येतात. असे खेळ व त्याचे शास्त्र असे दुहेरी महत्त्व शिरीष कुसुम प्रभाकर चव्हाण यांनी  ‘भारतीय पारंपरिक खेळ व त्यामागील शास्त्र’मधून सांगितले आहे.

यात खेळाचा प्रकार, तो कसा खेळायचा, मैदान, साहित्य व खेळाडूंची आवश्यकता, शारीरिक घटकानुसार शास्त्रीय फायदे, मुलभूत हालचालींचे कौशल्य, मानसशास्त्रीय फायदे व जीवन कौशल्ये कशी आत्मसात करता येतात, हे स्पष्ट केले आहे. अगदी लपंडाव, लंगडी, जोड साखळी, पकडापकडी, डोंगराला आग लागली...., लगोरी, डब्बा ऐसपैस, लुटूपुटीची लढाई, नाव-गाव-फळ-फूल असे मैदानावर आणि घरात खेळता येणाऱ्या ३५ खेळांचे महत्त्व यातून पटवून दिले आहे; तसेच पारंपरिक खेळाचे सामाजिक फायदेही समजावून दिले आहेत. 

पुस्तक : भारतीय पारंपरिक खेळ व त्यामागील शास्त्र
लेखक : निशा चव्हाण, शिरीष चव्हाण,
प्रकाशक : सी ईगल पब्लिकेशन 
पाने : ९९ 
किंमत : १५० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/QZXWCC
Similar Posts
युनायटेड वेस्टर्न बँक कोणतीही बँक अडचणीत येणे आणि बंद पडणे अथवा अन्य बँकेत विलीनीकरण करणे ही बँकिंग व्यवसायाच्या आणि गुंतवणुकदारांच्या दृष्टीने दुःखाची गोष्ट आहे. युनायटेड वेस्टर्न बँकसारखी एक चांगली बँक लयाला जाणे ही नक्कीच दुःखाची बाब आहे. या बँकेचा उदय, उत्कर्ष आणि अस्त अशा तीन टप्प्यांवर अरुण गोडबोले यांनी या पुस्तकात प्रकाश टाकला आहे
पुनर्जन्म मिथ्य की तथ्य पौराणिक कथांमध्ये पुनर्जन्माचे अनेक दाखले देण्यात येतात. खरेच असतो का पुनर्जन्म, याच प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा डॉ. विद्याधर गोपाळ ओक यांनी प्रयत्न केला आहे. पुनर्जन्म का, कसा, केव्हा, कोणाचा होतो यांचा विचार पुस्तकात प्रारंभी केला आहे.
पगारातून आयकरकपात मार्गदर्शिका (२०१८-२०१९) वर्षानुवर्ष नियमितपणे आयकर भरणाऱ्यांनासुद्धा आयकर कायद्याची संपूर्ण माहिती नसते. ही माहिती इंग्रजीत उपलब्ध असल्यामुळेसुद्धा ती नीट वाचली जात नाही; पण प्रत्येक करदात्याला हे माहित असणे आवश्यक असते. त्या दृष्टीने अरुण गोडबोले यांनी आर्थिक वर्ष २०१८-२०१९साठी हे पुस्तक लेखन केले आहे.
सोळा संस्कार- का आणि कसे + व्रतवैकल्ये कोणी- कोणती-का करावी? जीवन समृद्ध होण्यासाठी मनावर आणि बुद्धीवर संस्कार होणे आवश्यक असते. आर्य वैदिक धर्मात त्यासाठी १६ संस्कार कोणते, त्यांचे स्वरूप काय, त्याचा हेतू काय याची माहिती वेदमूर्ती श्रीकांत चितळे गुरुजी यांनी या पुस्तकात दिली आहे. जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचे हे संस्कार आहेत. ते विधीपूर्वक केले जातात. श्रवण सुरू झाला की व्रतवैकल्ये सुरू होतात

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language